Type Here to Get Search Results !

पुण्यातील बीआरटी हटवा, बीआरटी मार्गिकेतून खासगी वाहनांना प्रवेश द्या; सर्वपक्षीय आमदारांची विधानसभेत मागणी

 

पुणे, दि. 31 डिसेंबर 2022 (चेकमेट टाईम्स): विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी शहरातील आमदारांनी पुण्यातील वाहतूक समस्या, सार्वजनिक वाहतूक आणि बीआरटीमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांबाबत लक्षवेधी उपस्थित केली.

 

शहरातील जलद बस वाहतूक योजनेमुळे (बीआरटी) नागरिकांची सोय होण्यापेक्षा त्यामुळे होणाऱ्या कोंडीतून नागरिकांना नाहक त्रासच सहन करावा लागत असल्याने बीआरटी हटविण्याची मागणी करून बीआरटी मार्गिकेतून खासगी वाहनांना प्रवेश द्यावा, असे आग्रही मत शहरातील सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी विधानसभेत मांडले. त्यावर राज्य सरकारच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समिती स्थापन करून आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थित केलेल्या या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये आमदार चेतन तुपे, भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे व भीमराव तापकीर आणि राहुल कुल यांनीही शहराच्या वाहतूक समस्या सोडविण्याबाबत कार्यवाहीची मागणी सभागृहात केली.

टिंगरे म्हणाले,”नगर रस्ता आणि विश्रांतवाडी रस्त्यावरील बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी, हा मार्ग काढून वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी.”

 

तर, हडपसर-स्वारगेट बीआरटी मार्गावर उभारलेला सायकल ट्रॅक आता वाहतुकीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा ट्रॅक काढून रस्त्याची रुंदी वाढवणार का, असा प्रश्न तुपे यांनी उपस्थित केला. बीआरटी मार्गातून सध्या दर पाच मिनिटांनी बस जात नसल्याने काही दिवस खासगी प्रवासी वाहनांना या मार्गिकेतून जाण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना शिरोळे यांनी केली.

 

“बीआरटीला विरोध झाला असेल. मात्र, बीआरटीची कामे पूर्ण झाल्यानंतर ती सुरळीत चालू होती. बीआरटीचा नागरिकांना त्रास होत असेल, तर तेथील वाहतूक सुरळीत कशी करावी, यासाठी संबंधित यंत्रणांची एक बैठक लावली जाईल. तसेच, नगर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी बीआरटीमुळे होत नसून, मेट्रोचे काम सुरू असल्याने होत आहे.” असे सामंत यांनी सांगितले.

 

महापालिकेने २००६ मध्ये स्वारगेट ते कात्रज यादरम्यान बीआरटी योजना जाहीर केली. ही प्रायोगिक बीआरटी होती. त्यावेळी आम्ही या योजनेला विरोध केला होता. त्या ठिकाणी आंदोलने झाली. मात्र, नागरिकांचा विरोध डावलून ही योजना राबवली गेली. “आतापर्यंत या प्रायोगिक मार्गावर ११० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे. मात्र, अद्यापही सायकल ट्रॅक, पदपथ पूर्ण क्षमतेने झालेला नाही. मात्र, खर्च पुष्कळ झाला. राज्य सरकार त्या खर्चाची चौकशी लावणार का ?” असा प्रश्न भीमराव तापकीर यांनी उपस्थित केला.



यावर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले,”बीआरटी मार्ग हटवणे किंवा बीआरटी मार्गात खासगी वाहनांना परवानगी देणे, याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. ती समिती आवश्यक सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेईल.”

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.