Type Here to Get Search Results !

दोन दिवसांनंतर कधीही पाऊस सुरु होण्याचा अंदाज

 


पुणे, दि. 27 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात थंडीने घातलेले थैमान कमी होत चालले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात 24 जानेवारीपासून ढगाळ वातावरण होण्यास सुरूवात झाली आहे.

अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे ज्या भागात पाऊस झाला आहे त्या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात आकाश ढगाळ होत आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील दूधड, शेंदूरवादा, गोदावरी नदी काठच्या कायगाव (ता. गंगापूर) परिसरात, तसेच लिंबेजळगाव, लोहगाव व परिसरात पाऊस झाला, औरंगाबाद शहरात मेघगर्जनेसह तर ढोरकीन, बालानगर परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तसेच नगर जिल्ह्यातील सोनई, नेवासा, वांबोरी, राहुरी, कर्जत येथे पावसाच्या सरी पडल्या. लोहगाव (ता. नेवासा) तुरळक गारपीट झाली.

 

दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 30.8 (13.8), जळगाव 28.7 (16.4), धुळे 27 (10.2), कोल्हापूर 29.5 (18.8), महाबळेश्वर 23.6 (14.9), नाशिक 27.5 (12.6), सांगली 30 (19.4), सातारा 31.3 (18.2), सोलापूर 32.6 (20.9), रत्नागिरी 27 .6 (19.8), औरंगाबाद 29.4 (13.2), नांदेड 32.6 (18.8), अकोला 32.5 (18.1), अमरावती 31 (16.9), बुलडाणा 30.2 (16.3), चंद्रपूर 29.2 (16.8), गडचिरोली 30.2 (14.6 ), गोंदिया 30.8 (17), नागपूर 31 (16.3), वर्धा 31.1 (17), यवतमाळ 31.5 (16.5) तापमानाची नोंद झाली.

 

अचानक बदलेल्या वातावरणामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद, नगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज (दि. 27 जानेवारी 2023) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

दरम्यान पुणे जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यातच जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यास नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. गहू, कांदा पिकांना फटका बसत आहे. गहू पिकांवरही रोगांनी आक्रमण केले आहे.

 

गेल्या दोन, तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यांत विविध ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली असून फळबागांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे नुकतेच पंचनामे झाले असले तरी मदत अद्यापही मिळालेली नाही. सध्या ज्वारी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पिकाची वाढ पाण्याअभावी खुंटली आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes       

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.